Breaking News

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर

ठाणे :सहकार नगर, शास्त्री नगर चे रहिवाश्यांसाठी खुशखबर केंद्र सरकार चा जागे वर पुर्नवसन प्रकल्प !

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर
मुंबई: (अतुल तिवारी)
महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलत नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने हा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक पार पडली आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मंत्रीमंडळात नव्याने समावेश झालेले छगन भुजबळ, राज्याच्या मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव उपस्थित होते. यादरम्यान अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. (Maharashtra Government’s Housing Policy)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असून ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार अशा विविध समाजघटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. राज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेता, सर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.” प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
या मंत्रिमंडळ बैठकीत गृहनिर्माण विभागाव्यतिरिक्त, जलसंपदा विभागाअंतर्गत चार प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. तसेच विधी व न्याय विभागक, नगरविकास विभाग, उद्योग विभागांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

 

राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर

‘माझे घर-माझे अधिकार’ या ब्रीदवाक्यासह राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम राबविले जाणार असून. यात अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार केला जाईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button