‘काल्हेर’येथील नोबेल गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
संपादक: अतुल तिवारी

ठाणे जिल्ह्यातील ‘काल्हेर’येथील नोबेल गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न….
विध्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान…
ठाणे प्रतिनिधी-15 ऑगस्ट नोबेल गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेचे चेअरमन विश्वजीत मोहंती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका मोहंती सरपंच अर्पिता पाटील, उपसरपंच हरीश जोशी व अन्य प्रमुख पाहुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असंख्य संख्येने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सरपंच यांनी 15 ऑगस्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देताना म्हणाले की देशभक्ती जनजागृती आपल्या सभोवताली अनेक क्रांतिवीरांनी देशाच्या स्वतंत्र करता आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताची निर्मिती केली उपसरपंच म्हणाले की देशाची प्रगती करण्याची असेल तर विद्यार्थ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका मोहती यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त कै. दिवेलोचन( सर )यांनी विद्यार्थ्यांना दिलेली शिकवण आत्मसात करण्याची प्रामुख्याने गरज आहे सदर रॅलीमध्ये वर्ग आठवी नववी दहावीचे लेझीम पथक ढोल ताशाच्या भव्य मिरवणूक काढण्यात आली देशभर भक्ती जाग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारत माते की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा घरघर तिरंगा अशा प्रकारच्या घोषणांनी वातावरण निर्मिती केली कार्यक्रमात पेडर्स ए कॅम्प .गाणी, डान्स, कविता ,राष्ट्रावर बनवून निर्मिती केली गेली नाशिक येथे कराटे मध्ये गोल्डन, सिल्वर मेडल ,फायर आठ मार्शल ,व 14 इंडियन कॅम्प मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला पालक वर्ग मोठ्या यावेळी नाशिक येथील कराटे चॅम्पियन मधील सिल्वर व गोल्ड मेडल मिळविलेला विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले.